Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय | Vktrutv Spardhesathi Vishay

Vktrutv Spardheche Vishay, वक्तृत्व स्पर्धा, भाषणाचे विषय

आपल्या वक्तृत्वशैलीद्वारे श्रोतावर्गाला आकर्षित, प्रभावित करून आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य हे वक्तृत्व कलेत असते. वक्तृत्व हे एक शास्त्र असून ती एक उत्तम कलाही आहे. या कलेपासून श्रोत्यांना ज्ञान, प्रेरणा, आनंद आणि मानसिक प्रसन्नता मिळते व त्यासाठी ही कला व्यक्त्याने आत्मसात करणे, जोपासणे गरजेचे असते. आपले विचार मांडत असताना सुरुवात, मध्य व शेवट यांचा सांगोपांग विचार करून नेमके मुद्दे मांडणे किंवा सांगणे महत्त्वाचे असते व हे सर्व लेखन, वाचन, व्यासंग यातून साध्य होते. खूप वाचन, लेखन केल्याने कल्पनेला वाव मिळतो व भावना प्रभावीपणे मांडता येतात व आत्मविश्वासही वाढतो. भाषणाची सुरुवात ही प्रभावी असेल तर श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणे सहज शक्य होते. भाषणाचा मध्य हा विषयाचा गाभा असावा तर शेवट हा श्रोत्यांच्या मनावर चिरस्थायी ठसा उमटविणारा असावा. भाषाशैली, नाट्यपूर्ण हावभाव, आवाजातील आरोह-अवरोह, मुद्देसुद मांडणी व टिपणांचा चपखल वापर इत्यादींमुळे व्याख्यान हे नेहमी प्रभावी ठरत असते.

    चांगले वक्ते घडविण्यासाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक व इतर संस्था काम करीत असतात. अनेक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. चांगले विचार मांडण्यासाठी चांगले विषय असणे हे तितकेच महत्त्वाचे व गरजेचे आहे. अनेक वेळा नवीन संयोजकांना चांगले विषय मिळत नाहीत किंवा विषय कसे स्पर्धेला द्यावेत हे कळत नाही म्हणून आम्ही वक्तृत्व स्पर्धांच्या विषयाची सूची तयार केली आहे.

 वक्तृत्व स्पर्धेचे विषय -  

१) स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड छत्रपती संभाजी महाराज..
२) आधुनिक कृषितंत्रज्ञान शेतीला तारक की मारक?
३) कुणाच्या डोक्यात? शेती धोक्यात?
४) खरंच शेतीच नसती तर?
५) काळाच्या ओघात शेतकरी संपेल काय?
६) खरा वृक्षमित्र अभिनेता सयाजी शिंदे.
७) प्रेम एक अंधश्रद्धा.
८) खाजगी क्लासेस शिक्षकांचा अपमान..
९) इतिहास वर्तमान संपवू पाहतोय का?
१०) शब्द माझे माझीया हातातील तलवार आहे.
११) मला एक नचिकेता द्या मी जग बदलतो.
१२) व्यवस्थेला सुरुंग लावणारा संत विद्रोही तुकाराम.
१३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : काल, आज आणि उद्या...
१४) आता चित्रपटही आमचा-तुमचा?
१५) जागतिकीकरण आणि भारत.
१६) विकास आणि पर्यावरण.
१७) अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे...
१८) प्रसारमाध्यमे की प्रचारमाध्यमे?
१९) लोकशाही ते दडपशाही व्हाया ईडी.
२०) सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला...
२१) शेतकरी आत्महत्या व युवकांची भूमिका.
२२) मला पडलेले सुंदर स्वप्न.
२३) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज.
२४) डिजिटल इंडियाचे भविष्य.
२५) बुद्ध तत्त्वज्ञान व बाबासाहेबांचे अनुकरण.
२६) माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा.
२७) काळाच्या पुढे असणारे, धोरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
२८) छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक क्रांती.
२९) धर्मांचे ध्रुवीकरण.
३०) पर्यावरणवादी चळवळींतील भारतीय तरूण.
३१) लोककलावंतांच उपेक्षित जग.
३२) भूतां परस्परें जडो मैत्र जिवांचे!.
३३) शाळा महाविद्यालयांच्या अध्यापनाला कोचिंग क्लासेसचे ग्रहण.
३४) रील्स स्वैराचाराला आमंत्रण देतायत का?
३५) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय धोरण.
३६) जागतिक बाजारपेठेतील भारताचे सध्याचे स्थान व भविष्यातील वाटचाल.
३७) रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाला पुन्हा एकदा बुद्धाची गरज.
३८) प्रेम करणं हाच खरा विद्रोह आहे!
३९) अस्वस्थ वर्तमानात साहित्यिकांची भूमिका.
४०) छत्रपती संभाजी महाराज: स्वराज्याचा स्वाभिमान.
४१) पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला गरज.
४२) राष्ट्रपुरुषांच्या चारित्रातून आम्ही काय घ्यावे.
४३) सायबर विश्व आणि तरुणांची ढासळती मानसिकता.
४४) शिवशाही ते लोकशाही.
४५) ज्ञानाचे प्रतीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
४६) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.
४७) आजची सामाजिक परिस्थिती आणि बाबासाहेबांचे विचार.
४८) विसरत चालले बाबासाहेब.
४९) पुस्तकप्रेमी बाबासाहेब.
५०) जगाला शांततेचे बुद्ध हवे की अस्थिरतेचे युद्ध?
५१) शिवराय-भिमराय एकाच मनात जागले पाहिजेत!
५२) आंदोलने "भारतीय" लोकशाहीला नवसंजीवनी देतील का?
५३) एका शब्दाने सारा घोळ केला.
५४) स्रियांना ५०% आरक्षण मिळालं पण १००% संरक्षणाचे काय?
५५) भ्रष्टाचाराच्या किडीवर कोणतं किटकनाशक फवारावं?
५६) अनाथ मी तुझ्याविना...
५७) देशभक्ती की धर्म भक्ती...!
५८) पंचाहत्तरी ओलांडली तरी यौवन त्याचे कायम आहे. 
५९) प्रेमाच्या वाटेवर “जात” असताना.
६०) आम्ही महिला की पुरुष?
६१) जगणे महाग होत आहे.
६२) बळीचा “राजा” प्रशासनाचा जोकर.
६३) माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान.
६४) स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान.
६५) भारतमातेचे स्वप्न.
६६) स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी.
६७) भारत: काल, आज, आणि उद्या.
६८) स्वातंत्र्याचा रणसंग्राम.
६९) स्वातंत्र्य लढ्यातील साहित्यिकांचे योगदान.
७०) आत्मनिर्भर भारत.
७१) भारतीय स्वातंत्र्य.
७२) माझा देश मी देशाचा.
७३) आमचे मार्गदर्शक कोण शिक्षक की सेलिब्रिटी?
७४) युवकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.
७५) कोरोना एक वैश्विक महागुरू.
७६) माणूस द्या मज माणूस द्या.
७७) मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
७८) मी शेतकरी बोलतोय.
७९) छत्रपती शिवाजी महाराज.
८०) शाळा ऑनलाईनच राहिली तर...
८१) कोरोनाने आणि आम्हाला काय शिकवलं.
८२) शिवरायांचे बालपण.
८३) आज शिवराय असते तर...
८४) अफजलखानाचा वध.
८५) कोणत्याही एका किल्याचा इतिहास व आत्ताची परिस्थिती.
८६) शिवकालीन स्वराज्य आणि आधुनिक महाराष्ट्र.
८७) शिवकालीन समाज व्यवस्था.
८८) छत हरवलेल्या लेकरांसाठी सिंधुताई हो!
८९) ऑनलाईन शिक्षण-तारक की मारक.
९०) इतिहासातून नेमकं काय घ्यावं...?
९१) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
९२) प्रेतं कधीच करत नाहीत विद्रोह.
९३) मी अक्षर अक्षर पेरीत जातो रक्त...!
९४) चित्रपट: मनोरंजन,व्यवसाय की प्रबोधन.
९५) तिरंगा माझा.
९६) मी सैनिक झालो तर...
९७) माझा आवडता स्वातंत्र्य सैनिक.
९८) वैखरीचे वारकरी, विचारांचे धारकरी-प्राचार्य शिवाजीराव भोसले.
९९) जगण्यासाठीचे युद्ध की जैविक युद्ध?
१००) स्त्रीवादाचे बदलते आयाम.
१०१) जिंदगी नॉट आउट...
१०२) ब्रेकींगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या!
१०३) खरा तो एकची धर्म.
१०४) शिवचरित्र : एक संस्काराचा धडा.
१०५) महात्मा गांधी समज आणि गैरसमज.
१०६) स्त्रियांवरील वाढता अत्याचार संरक्षण आणि उपाय.
१०७) मानसिक आरोग्य धनसंपदा.
१०८) व्यसन सोशल मिडीयाचे, पालटले चित्र समाजाचे.
१०९) कोरोना महामारी आणि सन्मान कोरोना योध्दयांचा.
११०) आजचा शेतकरी आणि कृषी कायदे.
१११) स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांनंतर आरक्षणाची आवश्यक्ता आहे काय?.
११२) धडपडणारी तरुणाई.
११३) हे जीवन सुंदर आहे..
११४) लॉकडाऊनमुळे मला जगणं समजू लागलं..
११५) मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री असावे तर असे...
११६) आज जीव वाचेल, उद्याच्या शेतीचे काय?
११७) गौतम बुद्ध यांना अभिप्रेत माणूस...
११८) ती सध्या काय करते?
११९) मला समजलेले छत्रपती संभाजी महाराज.
१२०) मी माझ्या उज्ज्वल भविष्याची तयारी करतोय..
१२१) माझी सावित्रीबाई होती म्हणून...
१२२) मी इतिहास आणि परंपरा नाकारतो कारण...
१२३) भारत आमचा, तुमचा आणि त्यांचा...
१२४) सांग कधी कळणार तुला भाव मा‍झ्या मनातला...
१२५) चित्रपट आणि मालिका इतिहास की अतिश्योक्ति ?
१२६) तेजस्वी अभिनयाचा सूर्य पाहिलेला माणूस- डॉ. श्रीराम लागू
१२७) मार्क्स, गांधी आणि आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समाजव्यवस्था.
१२८) शाश्वत विकास आणि पर्यावरण.
१२९) विद्यार्थी आंदोलने आणि विद्यापीठे.
१३०) शेतकरी आत्महत्या...कारणे व उपाय.
१३१) युवाशक्ती, राष्ट्रशक्ती.
१३२) युवकांनी राजकारणात या.
१३३) लोकशाहीचे वस्त्रहरण होते आहे काय?
१३४) पाणी पेटते आहे...!
१३५) ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय.
१३६) देशाची अर्थव्यवस्था...विकट की बळकट.
१३७) जगणे ‘महाग’ होत आहे.
१३८) असा घडवूया महाराष्ट्र.
१३९) स्वच्छ सुंदर परिसर.
१४०) टाकाऊ पासून टिकाऊ.
१४१) माझी वसुंधरा.
१४२) कचरा वर्गीकरण व प्रक्रिया.
१४३) वृक्षारोपणाची गरज.
१४४) प्लास्टिक बंदी - काळाची गरज.
१४५) जलसंधारणाच महत्त्व.
१४६) जागर स्त्री शक्तीचा, सन्मान स्त्री मुक्तीचा.
१४७) .. आणि पुन्हा कॉलेज कट्ट्यावर.
१४८) नैसर्गिक आपदा व आधुनिक मानवी जीवन.
१४९) सत्याग्रही क्रांती शास्त्र.
१५०) मी शेतकरी होणार.
१५१) थांबला तो संपला.
१५२) गीत नवे गाईन मी.
१५३) आपले स्नेहांकीत.
१५४) गरजा महाराष्ट्र माझा.
१५५) ऑनलाईन... ऑफलाईन...
१५६) दुष्काळ आणि महापूर- मानवनिर्मित की निसर्गनिर्मित.
१५७) मोबाईल खेळ : घातक व्यसन.
१५८) रायगडाला जेव्हा जाग येते.
१५९) हे जीवन सुंदर आहे.
१६०) गांधीजी मरत का नाहीत...!
१६१) समाज माध्यमांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई.
१६२) उच्च शिक्षण: अपेक्षापूर्ती की अपेक्षा भंग.
१६३) १.५ जीबी डेटा बेरोजगारीची न होणारी जाणीव.
१६४) स्त्री म्हणून वेगळं जगायचय मला.
१६५) प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते.
१६६) महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे.
१६७) आणखी किती निर्भया?
१६८) इतिहासातील स्त्री आणि आजची स्त्री.
१६९) खरंच स्त्री पुरुष समानता आहे ?
१७०) स्त्री म्हणजे काय?
१७१) आता रडायचं नाही तर लढायचं आहे.
१७२) भारतीय शेतीतील महिलांचे योगदान.
१७३) कुटुंब प्रमुख म्हणून स्त्रियांचे योगदान.
१७४) कुटुंबातील आरोग्य आणि शिक्षण यातील महिलांचे योगदान.
१७५) स्त्रीचे मानवी समाजातील स्थान.
१७६) मानवतेचा वैश्विक जाहीरनामा : भारतीय संविधान.
१७७) सावधान : तुम्हारी बस्ती जलनेवाली है.
१७८) मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
१७९) माणसातील देव माणूस-पोलीस,डॉक्टर आणि सफाई कर्मचारी.
१८०) हा रस्ता अटळ आहे...
१८१) माय नेम इज खान & आय एम नॉट अ टेरेरिस्ट.
१८२) झुकते माप कुणाला देऊ मी आता ? डाव्यांचाही आत एक उजवा आहे.
१८३) त्या पत्रकारांच्या 'जमातीचे' करायचं काय?
१८४) सेलिब्रिटीजच्या इतिहासाला लागले प्रसिद्धीचे संदर्भ.
१८५) इमोजीसच्या या बोलघेवड्या युगात कोण ऐकेल माझ्या स्पंदनांची विराणी?
१८६) मानवतेला घाम फुटतो बॉम्ब गोळे पडताना
आमचा जवान शहीद होतो सीमेवरती लढताना..
१८७) धर्माच्या नावावर होणारा अधर्म म्हणजे तालिबान.
१८८) अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील बंड.
१८९) आनंदाचा टोल फ्री क्रमांक “मित्र”...
१९०) कृषिप्रधान भारतातील आत्महत्याप्रधान शेतकरी...
१९१) शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे...?
१९२) अरे मानसा मानसा कधी होशील माणूस?
१९३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महिलोन्नती.
१९४) महिलांसाठी एक विसावा.
१९५) येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी.
१९६) भारतीय अर्थव्यवस्था काल, आज आणि उद्या.
१९७) राष्ट्रसंतांची ग्रामगीता-(मानवी कल्याणाचे शास्त्र)
१९८) शेतकरी नसेल तेव्हा.
१९९) युवकांपुढील आव्हाने.
२००) वर्तमानाला मार्गदर्शक, भविष्याला दिशादर्शक छत्रपती शिवाजी महाराज.
२०१) जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे...
२०२) माणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता?
२०३) सावधान! माणसाचा मेंदू अंगठ्यात आला आहे.
२०४) कृषिप्रधान भारतात रोजच शेतकर्‍यांच मरण!
२०५) राजे तुम्ही असता तर...
२०६) शिक्षण क्रांतीच्या उंबरठ्यावर.
२०७) लोकशाही लोकांची का शाही लोकांची.
२०८) ‘शेतकरी’ स्वराज्यात सुखी, लोकशाहीत दु:खी.
२०९) निर्भय ते निर्भय्या प्रवास स्त्री सुरक्षेचा व्हाया जिजाऊ सावित्री.
२१०) धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव.
२११) छ.शिवरायांच्या शेती धोरणाची देशाला गरज.
२१२) सावध ऐका पुढच्या हाका..
२१३) विकासाची बदलती व्याख्या.
२१४) जे सत्य सुंदर सर्वथा अजन्म त्याचा ध्यास दे...
२१५) मराठी चित्रपटसृष्टीचे बदलते अंतरंग...
२१६) वक्तृत्व काळाची गरज.
२१७) राजकारण आणि तरुणाई.
२१८) न्याय, स्वातंत्र्य, समता.
२१९) महिला अत्याचार - कारणे व उपाय.
२२०) आपण आधुनिक आहोत का..?
२२१) संविधान रक्षण - काळाची गरज.
२२२) शेतकरी आत्महत्या-कारणे व उपाय.
२२३) लोकशाहीचा जय म्हणा!
२२४) राष्ट्रनिर्माणासाठी युवकांची भूमिका.
२२५) सोशल मिडिया - चिंता व चिंतन.
२२६) आवाहन नव्या दशकाचे.
२२७) माझी डिजिटल पार्टी.
२२८) सरमिसळ तुमची आमची.
२२९) शांतता की विद्रोह ?
२३०) तुझं तू माझं मी उर्फ TTMM.
२३१) माझ्या गावाचे सर्वांगीण पाणी नियोजन.
२३२) आमच्या तालुक्याचा पाणी प्रश्न असा सुटेल...
२३३) महाराष्ट्र- दंडकारण्य ते वाळवंट.
२३४) वॉटर फूट प्रिंट आणि पाणी व्यवस्थापन.
२३५) सांडपाणी आजचा सर्वात मोठा स्थानिक जलस्रोत.
२३६) पश्चिम घाट वाचवा!
२३७) पाणी प्रश्न व जैवविविधतेवरील आघात.
२३८) फॅशन व जलप्रदूषण.
२३९) लावू मीटर सिंचनासाठी!
२४०) पाणी पर्यावरण आणि शालेय अभ्यासक्रम.
२४१) जल है तो कल है.
२४२) जल संवर्धन आपली जबाबदारी.
२४३) ड्रॅगनची शेपूट वाकडी!
२४४) आता भारत २०३०...?
२४५) लखलख चंदेरी तेजाची काळी दुनिया?
२४६) कल्की अवतरलाच नाही तर...?
२४७) आज जाणावे वाटते त्याच्या अंतरीचे गुज.
२४८) मॅराडोना: डागाळलेला पण सूर्यच!
२४९) मी अनुभवलेला लॉकडाऊन.
२५०) संघटनेचे महत्व.
२५१) सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुण पिढी.
२५२) बदलते मानवी जीवन.
२५३) युवती आणि राजकारण.
२५४) आजची कुटुंब व्यवस्था.
२५५) देशाची शान - स्त्रीचा सन्मान.
२५६) गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही!
२५७) माझ्या स्वप्नातील भारत.
२५८) स्त्री-पुरुष समानता.
२५९) हे विश्वची माझे घर.
२६०) स्त्रियांना हवे काय रक्षण की आरक्षण.
२६१) बळीराजाचे अश्रू आटले, शब्द गोठले.
२६२) शब्द तासून घ्यायला हवेत.
२६३) तू माझ्यातल्या पुरुषाला शरण का जातेस?
२६४) धर्म स्वीकारत नाही उत्सव झेंड्याचा.!
२६५) ... ही दुनिया अडीच अक्षरांची.!
२६६) सगळ्याच वेदना कवितेत मावत नाहीत...
२६७) शेतकरी मरत नाही, तो मारला जातो.
२६८) राष्ट्रपिता महात्मा गांधीजी!
२६९) स्त्री सुरक्षित आहे का?
२७०) भारत महासत्ता कधी होईल?
२७१) कोरोनाने जगाला काय दिलं?
२७२) नेपोटीझम एक भयभीत वास्तव.
२७३) माणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता?
२७४) रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो...
२७५) वर्तमानाला मार्गदर्शक भविष्याला दिशादर्शक शिवरायांचा इतिहास.
२७६) आत्मनिर्भर भारत.
२७७) रामराज्य ते रामजन्मभूमी.
२७८) ज्ञानियाचा आणि तुकयाचा तोच माझा वंश आहे!
२७९) महिला धोरण ते महिला सक्षमीकरण एक प्रवास.
२८०) बदललेले शैक्षणिक धोरण आणि रोजगार.
२८१) हे ही दिवस निघून जातील.
२८२) छ. शिवाजी राजे - दि मॅनेजमेंट गुरू.
२८३) खलनायक की नायक - निळू फुले.
२८४) सावधान पाणी पेटते आहे.
२८५) रिॲलिटी शो नक्की काय देतात.
२८६) धर्म आणि असहिष्णुतेत मानवता धर्म हरवतो आहे.
२८७) जग जवळ आलं माणसांच काय?
२८८) छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीला समजले का?
२८९) छत्रपती संभाजी महाराज व आजचा युवक.
२९०) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण.
२९१) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एक बहुआयामी व्यक्तिमत्व.
२९२) स्त्री असणं म्हणजे...?
२९३) जा सखे जा वाट आता काळजाची बंद आहे, राहिला बस लेखणीला वेदनेचा गंध आहे.
२९४) आरक्षणाचा सामाजिक आक्रोश.
२९५) वणवा तसाच आहे पाऊस मरूनी गेला.
२९६) विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला..
२९७) गड संवर्धनात युवकांचा सहभाग.
२९८) भविष्याचा दिशादर्शक, वर्तमानाला मार्गदर्शक - शिवबाचा इतिहास.
२९९) जेव्हा माणसंच माणसाविरुध्द पुकरतात युद्ध,
तेव्हा सांगावाच लागतो तथागत बुद्ध.
३००) आसवे मी मुक केली, लेखणी बंदूक केली.
३०१) स्वच्छ भारत अभियान ते पॅडमॅन.
३०२) डिजीटल इंडियाच्या पोटात होणारा वावराचा गर्भपात...
३०३) संत अवतार होती याचसाठी... अंधारात दिवटी दावावया...
३०४) चेतावया प्राण हा, तू जीवाची वात दे, फक्त जागा आपल्या काळजाच्या आत दे...
३०५) गड संवर्धन काळाची गरज.
३०६) छत्रपती शिवाजी महराज व त्यांचे गडकोट.
३०७) शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवराय.
३०८) छत्रपती संभाजी महाराज एक दिव्य जीवन.
३०९) आजची तरुणाई व उत्सव.
३१०) राजमाता जिजाऊ.
३११) लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज.
३१२) दुरितांचे तिमिर जावो...
३१३) फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे झाले काय,
तुमच्या आमच्या हाती आले काय?
३१४) काळीज हरवतं तेव्हा...
३१५) माणसांच्या आसवांना वाचणारा पाहिजे.
३१६) आभाळ काय, काळीज काय आणि जमीन काय, ओलावा हरवत चाललाय.
३१७) माझे देव माझे मायबाप.
३१८) जळला मेला मोबाईल.
३१९) मी शेतकरी होणार.
३२०) गाव माझा मी गावाचा.
३२१) अहो बाया.. व्यसन करू नका..
३२२) शोध पाण्याचा.
३२३) सांस्कृतिक युद्ध सुरूच आहे...
३२४) राधे, पुरुष असाही असतो!
३२५) धर्म सांगत नाही पाडा मुडदे ‘काहींचे’...
३२६) न बोलल्याचं दुःख नाही, स्माईली सोकावतेय.
३२७) सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती.
३२८) ऑनलाईन शिक्षण वास्तव आणि भविष्य.
३२९) आरक्षण जातीय की आर्थिक?
३३०) युगपुरुष महात्मा फुले.
३३१) कीर्तन प्रबोधन की मनोरंजन?
३३२) बांधापासून संसदेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रवास...
३३३) स्त्री असणं म्हणजे...
३३४) आनंदाचे शोधावे घर दुःखाच्या छाताडावर.
३३५) दिवसांचा मी अनुभवलेला ‘माझा बिगबॉस’.
३३६) पुरुषांना पण व्यथा असतात.
३३७) मला फक्त अंधार दूर होण्याशी मतलब आहे...
३३८) आपण भयंकराच्या दारात उभे आहोत.
३३९) टिळक - सावरकर- गांधी- आंबेडकर.
३४०) ग्रामगीता: नवयुगाची आधारशीला.
३४१) आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती...
३४२) स्वतंत्र विदर्भ: राजकारण की सोय?
३४३) सोशल मिडीयाच्या चक्रव्यूहात भारतीय तरुणाई.
३४४) प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा...
३४५) तुका म्हणे तोची संत...
३४६) देशा पुढील आव्हाने आणि राष्ट्रसंतांचे विचार.
३४७) पप्पा, कार नको संस्कार द्या!
३४८) भारतीय लोकशाही : स्थिती आणि गती.
३४९) उच्च शिक्षण : अपेक्षापुर्ती की अपेक्षाभंग.
३५०) ... एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण.
३५१) ... संतांचे पुकार वांझ झाले?
३५२) संस्काराची विद्यापीठे हरवलीत कुठे?
३५३) ती सध्या काय करते?
३५४) जनता दारात, नेता घरात.
३५५) वर्तमान शिक्षण अपेक्षा आणि वास्तव.
३५६) राष्ट्रसंताचा राष्ट्रवाद.
३५७) संस्कारे घडतो माणूस.
३५८) पण “ती” मशाल पेटवुन गेली.
३५९) भारतीय तरुण: इतिहास व भविष्य.
३६०) भ्रष्ट झाले श्रेष्ठ अन् शेतकर्‍याला कष्ट.
३६१) भारतीय लोकशाहीचा प्रवास.
३६२) जाने कहा गये ओ दिन !
३६३) वारी समतेची.
३६४) राजकारण, निवडणूक आणि तरूणांच भविष्य.
३६५) प्रसार मध्यमांना मूळ प्रश्न दिसत नाहीत का?
३६६) नव्या भारतासाठी.
३६७) मुलभूत कर्तव्यांचा विसर पडतोय का?
३६८) जिंदगी एक सफर है सुहाना.
३६९) विकास संकल्पना आणि मार्ग.
३७०) तुमची सर्व भाषणे ही क्रांतिगीते ठरोत!
३७१) जगाची नवी दिशा - लेफ्ट-राईट-लेफ्ट
३७२) तत्त्वज्ञानाचा देव धर्मात बसत नाही.
३७३) पुरुष का प्रेम उसके मौन में छुपा होता है|
३७३) माणसाची हरवलीय अक्कल, जिथं तिथं हॅलो अलेक्सा आणि ओके गूगल.
३७४) जाताना मुक्याने जाणार नाही; या पसाऱ्याला शाप देऊन जाईन!
३७५) प्रेम म्हणजे?
३७६) स्वदेशी आणि भारत.
३७७) बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व्यापार आणि भारताचे स्वातंत्र्य.
३७८) आई खरंच काय असते?
३७९) जातीय जनगणना योग्य की अयोग्य
३८०) जगी सर्वसुखी असा कोण आहे?
३८१) मृत्यू अटळ आहे, मृत्यू सुंदर आहे.
३८२) जाती धर्मा पलिकडचा भारत
३८३) राजकारणासाठी डिग्री आणि मेरीट हवं का ?
३८४) प्रेम पैसा प्रॉपर्टी आणि प्रेयसी
३८५) माणुसकीचा धर्म आणि धर्माची माणुसकी.
३८६) भारतीय हीच जात आणि धर्म
३८७) बौद्ध तत्त्वज्ञान आणि आत्मप्रचिती
३८८) भारतात महाराष्ट्राचे वेगळेपण
३८९) मराठी नेता पंतप्रधान केव्हा होईल .
३९०) मराठी अस्मिता म्हणजे काय?
३९१) उद्याचा भारत धर्मनिरपेक्ष असावा का?
३९२) सोन्याची उशी आणि आईची कुशी
३९३) शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचं नातं काय?
३९४) महाराष्ट्राची खरी ओळख
३९५) जगणे म्हणजे प्रयोग आहे...
३९६) शाश्वत काहीच नाही...
३९७) देव म्हणजे काय कुठे राहतो?
३९८) देह आणि भावना; देह जळतो भावनांच काय?
३९९) लग्नाचे वाढते वय एक ज्वलंत समस्या
४००) लग्नासाठी जोडीदार निवडताना
४०१) फॅशनमध्ये हरवली आईच्या पदराची उब
४०२) आर्थिक निकषावरचं आरक्षण
४०३) वसुंधरा परिषद आणि भारताची शाश्वत ध्येय
४०४) ट्रेनिंग आणि ड्रील कशी पाहिजे?
४०५) युवकांचा कर्मसिद्धांत आणि विवेकानंद

    वरील विषयाव्यतिरिक्त नवीन काही विषय आपणास सुचवायचे असतील तर आम्हाला ते आपण सुचवू शकता व त्यासाठी खालील कमेंट्स बॉक्सद्वारे कमेंट्स करा अथवा खालील मोबाईल नंबरवर क्लिक / टच करून व्हॉट्सॲप द्वारे पाठवा. आपण सुचविलेले विषय आम्हाला योग्य वाटल्यास आम्ही ते सूचीमध्ये अद्यायावत (अपडेट)करू.

-प्रमोद मोहिते, कराड
व्हॉट्सॲप नं.- ९५६१७००८००

भाषण स्पर्धा, Vktrutv Spardhesathi Vishay, Vktrutv Spardha, Marathi speech competition Subjects, 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या